
मुंबई - भाजपने पुन्हा एकदा दोन प्रादेशिक पक्षांना संपविले आहे. मोदी -शहा यांच्या मेहरबानीवर एकनाथ शिंदे, अजित पवार सरकारमध्ये असतील. शिंदे यांची तर भाजपला आता काहीच गरज नाही. त्यामुळे बहुमत मिळाल्यापासूनच शिंदे व अजित पवारांना भाजप व मोदी- शहा यांनी जागा दाखवून दिली असल्याचे फटकारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीच्या नव्या सरकारला मारले आहेत.