

Agariya Salt Workers Gujarat
esakal
Salt Workers Painful Story : मीठ म्हंटल की आपल्याला गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह आठवतो. 1930 मध्ये सविनय कायदेभंग करत त्यांनी सत्याग्रह केला होता. हा बंड होता जुलमी ब्रिटिशांच्या विरोधात. इंग्रज सरकारने मीठवर कर लावला होता. मीठ तर आपल्या जीवनातील अत्यावश्यक गोष्ट आहे मग हे इंग्रज कस काय यावर कर लावू शकतात..या विचारातून हे आंदोलन झाले होते. याची सुरुवात साबरमती(गुजरात) इथून झाली. हे आंदोलन कच्छ भागातून पुढे पुढे जात देशभर पसरले.
पण इतक्या वर्षानंतरही जिथे गुजरातच्या या कच्छ रणात जिथे पाणी आणि आकाश एकरूप होतात तिथे मीठाच्या चमकदार पांढऱ्या थराखाली दडलेले आहे एक कठोर जीवन. मीठात जीवनाचे सुख आहे, पण त्याच मीठात खोलवर वेदना देणारे दु:खही लपलेले आहे. हे दु:ख आहे गुजरातमधील लाखाहून अधिक आगरिया मीठ कामगारांचे ज्यांच्या नशिबात फक्त संघर्ष आणि तडजोड आहे.