From Italy to Maharashtra: How a Banned PFAS Chemical Plant Reached India
esakal
Explainers | विश्लेषण
Explained : इटलीत बंद पाडलेली विषारी 'यंत्रणा' रत्नागिरीत... कोकणचं भविष्य धोक्यात?, PFAS काय आहे? Italy मध्ये काय घडलं होतं?
Italy PFAS Disaster and Its Dangerous Shift to Maharashtra: इटलीत बंद झालेल्या पीएफएएस रसायन कारखान्याची यंत्रणा रत्नागिरीतील लोटे परशुराममध्ये; कोकणातील पर्यावरण, पिण्याचे पाणी आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होण्याची भीती
इटली देशात एक कारखाना होता, जो विषारी रसायनांमुळे बंद करण्यात आला. त्या कारखान्याने लाखो लोकांच्या पाण्यात विष मिसळले आणि आरोग्य बिघडवले. आता तेच यंत्रसामग्री आणि प्रक्रिया भारतात, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम भागात आणली गेली आहे. हे 'परमानेंट केमिकल' म्हणजे पीएफएएस रसायन बनवण्यासाठी आहे. हे रसायन पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिली, पण स्थानिक लोक आणि पर्यावरण तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. लोक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.

