नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असणारे बिल गेट्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पत्र लिहून कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठी जी पावलं उचलत आहे, ती अत्यंत प्रंशसनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने जी पावलं उचलली आहेत त्याचं आणि तुमच्या नेतृत्वाचं मी खरंच कौतुक करतो. देशातील हॉटस्पॉट ओळखून कोरोना बाधित रुग्णांना क्वारंटाइन करणं, लॉकडाउन जाहीर करणं, आरोग्य यंत्रणेला पाठींबा देण्यासाठी उचललेली पावलं हे प्रशंसनीय आहे, असे बिल गेट्स यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
आरोग्य सेतू अॅपचेही कौतुक
रिसर्च आणि डेव्हलपमेंट यासोबतच डिजीटल इनोव्हेशन या गोष्टीवरही सरकारने चांगला भर दिला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकार डिजीटल प्रणालीचा योग्य वापर करत आहे याचं मला कौतुक आहे. कोरोना विषाणूसंदर्भात सर्व वैद्यकीय सुविधेची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेलं आरोग्य सेतू अॅप, त्यावर करोना बाधित क्षेत्राची मिळणारी माहिती या सर्व गोष्टी दाद देण्यासारख्या आहेत, असेही गेट्स यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं होतं. याव्यतिरीक्त देशात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आणि प्रादूर्भावही काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. सर्व राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.