China India Border Issues
China India Border Issuessakal

China India Border Issues : चीनच्या उदयाचे देशासमोरआव्हान : सरसेनाध्यक्ष

‘‘चीनबरोबरील न सुटलेला सीमावाद आणि त्या देशाचे वाढते वर्चस्व हे नजीकच्या भविष्यात भारत आणि भारतीय लष्करासमोरील सर्वांत मोठे आव्हान असेल,’’ असे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी आज सांगितले.

पुणे : ‘‘चीनबरोबरील न सुटलेला सीमावाद आणि त्या देशाचे वाढते वर्चस्व हे नजीकच्या भविष्यात भारत आणि भारतीय लष्करासमोरील सर्वांत मोठे आव्हान असेल,’’ असे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी आज सांगितले. पुण्यात झालेल्या ‘चीनचा उदय आणि त्याचे जगावर होणारे परिणाम’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

जनरल चौहान म्हणाले,‘‘भारत आणि चीन सीमेशी संबंधित सर्व संघर्षबिंदूंवर चिनी सैनिकांना ठामपणे हाताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताचे आपल्या शेजारी देशांबरोबर सीमावाद आहेत आणि त्यातूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, ताबा रेषा आणि प्रत्यक्ष ताबा रेषा असे शब्द तयार झाले आहेत. चीनचा उदय आणि सीमावाद यांचे भारतासमोर आव्हान असेल. वाद असलेल्या सीमांच्या आणि प्रदेशांच्या बाबतीत भारताला आपल्या भूमिकेवर ठाम राहावे लागेल आणि निर्धाराने आपली बाजू मांडावी लागेल, तसेच दोन्ही देश कराराच्या चौकटीतच सर्व कार्यवाही करतील, याकडेही लक्ष द्यावे लागेल.’’

चीनचा खोडसाळपणा

नव्यानेच काही दावे करणे, जागांची नावे बदलणे, सीमेवरील सैन्याची हालचाल वाढविणे, अशा गोष्टी करण्याची चीनची सवय असल्याचे सरसेनाध्यक्षांनी या वेळी सांगितले. ‘‘चीनच्या अशा क्लृप्त्यांचा सर्व पातळ्यांवर एकत्रितपणे सामना करणे आवश्‍यक आहे. यामध्ये विचारवंत, धोरणकर्ते, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती या सर्वांचाच सहभाग गरजेचा आहे. समतोल साधण्यासाठी इतर देशांचीही एकजूट आवश्‍यक आहे,’’ असे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com