

नवी दिल्ली, ता. १ (पीटीआय) : ‘‘सर्वांच्या सहकार्याने हवामान बदलावर उपाययोजना करण्यासाठीचा वेळ संपत चालला आहे,’’ असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलांवरील ‘कॉप-३०’ परिषदेचे अध्यक्ष आंद्रे कोरेया दो लागो यांनी दिला. विकसित व विकसनशील देशांमधील राजकीय आणि आर्थिक दरी भरून काढण्याची गरज असून, याबाबत तातडीने हालचाली करण्याची आवश्यकता आहे, असेही लागो यांनी म्हटले आहे.