India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

Shishir Khanal News: नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल म्हणाले की, भारत आणि नेपाळ संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सीमावाद सोडवू शकतात. नेपाळला विकसित आणि उदयोन्मुख भारतासोबत एक मजबूत भागीदारी हवी आहे.
India Nepal relation

India Nepal relation

ESakal

Updated on

नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी म्हटले आहे की, नेपाळला भारतासोबतचा सीमावाद संवाद आणि राजनैतिक मार्गाने सोडवायचा आहे. जर दोन्ही देशांनी एकत्र बसून मोकळ्या मनाने चर्चा केली, तर कोणतीही समस्या इतकी मोठी नाही की ती सोडवता येणार नाही. नेपाळचे सध्याचे सरकार भारताकडे २१ व्या शतकातील राजकारण आणि जागतिक सत्तासंघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com