स्वावलंबी मुलांचे पालक असतात अधिक समाधानी

happy family
happy family

नवी दिल्ली : अपत्यप्राप्तीचा आनंद हा अवर्णनीय असतो. लहान मुलांचं घरात आगमन झालं, की घर आनंदाने भरून गेल्यासारखं होतं. मुलांच्या आगमनासोबतच त्यांच्या भविष्याबाबतची चिंता आणि तणाव देखील सोबतीला येतोच, हे आपण जाणतोच. मात्र, मुलं स्वतःच्या पायावर उभी झाल्यावर पालकांचं आयुष्य अधिक समाधानी होतं, त्यांच्या आयुष्यात नैराश्‍याचं प्रमाण देखील कमी होत जातं, असा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला आहे. 

युरोपातील 16 देशांमधील 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 55 हजार नागरिकांशी संवाद साधल्यानंतर स्वावलंबी असलेल्या मुलांचे पालक लहान अपत्य असलेल्या पालकांपेक्षा अधिक समाधानी असल्याचे सांगितले. मुलांसोबत राहणाऱ्या किंवा अपत्ये नसलेल्या पालकांपेक्षा आपल्या मुलांशी नियमितपणे संपर्कात राहणारे आई-वडील अधिक आनंदी असतात, असेही या संशोधनात आढळले. 

मित्र, नातेवाईक किंवा समाजाची सोबत असणे हे सर्वांसाठी आपलेपणाची आणि सहकार्याची बाब असते. लग्नानंतर मुलांना जन्म देणे पुरेसे नसते; तर भावना आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी लोकांमध्ये मिसळणे आवश्‍यक असते. जोडीदार आणि मुलं हे समाजाचे घटक असतात. त्यातून ज्येष्ठ नागरिकांना आणि पालकांना सामाजिक आधार देण्याबाबत त्याच्या जाणिवा प्रगल्भ होतात. पालकत्वाबाबत प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात आणि त्याबाबत मतभेद देखील असू शकतात. परंतु, जीवनातील समाधानाची भावना नेहमीच सामाजिक आधाराशी निगडित असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com