India Advises Nationals to Leave Iran Amid US Tensions
esakal
India Iran Advisory: अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासाने महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. इराणमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी शक्य तितक्या लवकर देश सोडावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. इराण अमेरिका यांच्यातील संघर्षानंतर दुतावासाने हे निर्देश दिले आहेत. ही अॅडव्हायजरी म्हणजे १४ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायजरीचा पुढचा टप्पा असल्याचंही दुतावासाने म्हटलं आहे.