
Chinese Foreign Ministry’s Official Statement : गलवान संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पुर्वी भारत आणि चीन यांच्यातील संबंधाबाबत एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, १८ आणि १९ ऑगस्ट रोजी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भारत भेटीनंतर भारत आणि चीनमधील महत्त्वपूर्ण करार शक्य झाला आहे.
भारत दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसए अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी व्यापक चर्चा केली. यासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती.
यानंतर आता भारत आणि चीन सीमा वादाशी संबंधित एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. चीन परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या नवी दिल्ली भेटीनंतर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतासोबतचा मोठा सीमा वाद मिटवल्याचा दावा केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, भारत आणि चीनमध्ये सीमा व्यवस्थापन आणि नियंत्रणाबाबत एक समान विचार निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील सीमेवरील सुमारे ५ वर्षांपासूनचा तणाव कमी होण्याची शक्यता आहे.
वांग यांच्या दौऱ्याबाबत माहिती देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, दोन्ही बाजूंनी विविध क्षेत्रात संवाद यंत्रणा पुनर्संचयित करणे, परस्पर फायदेशीर सहकार्य वाढवणे, बहुपक्षीयता टिकवून ठेवणे, जागतिक आव्हानांना संयुक्तपणे तोंड देणे आणि धमकावणाऱ्या एकतर्फी कृतींना विरोध करणे यावरही सहमती दर्शविली.
तसेच, "सीमा मुद्द्यावर, दोन्ही बाजूंनी एक नवीन समान समजूत काढली आहे, ज्यामध्ये सामान्य व्यवस्थापन आणि नियंत्रण, सीमावर्ती भागात शांतता राखणे आणि अटी पूर्ण करणाऱ्या क्षेत्रात सीमा चर्चा पुन्हा सुरू करणे यावर सहमती दर्शविली आहे." अशीही माहिती दिली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.