UN : दहशतवाद आणि काश्मीर मुद्यावरून भारताने पाकला पुन्हा झापलं

UN : दहशतवाद आणि काश्मीर मुद्यावरून भारताने पाकला पुन्हा झापलं
Summary

संयुक्त राष्ट्रात पाकचे प्रतिनिधी मुनीर अक्रम (Munir Akram) यांनी आरोप केला होता की, भारत पाकिस्तानात दहशतवादाला प्रमोट करत आहे.

न्यूयॉर्क - भारताने (India) पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रात (United Nations) पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. लष्करी संघर्षात नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आयोजित कार्यक्रमात भारताने पाकिस्तानला (Pakistan) चोख प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत आर मधुसूदन (R Madhusudan) यांनी पाकिस्तानला चपराक लगावताना म्हटलं की, पाकिस्तानचा तर इतिहास आहे दहशतवाद्यांना पोसण्याचा. जगात कुठेही दहशतवादी घटना घडली तर त्याचं मूळ हे कुठं ना कुठं पाकिस्तानात सापडतं. एवढंच नाही तर ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) हासुद्धा पाकिस्तानातच सापडला होता असंही त्यांनी म्हटलं.

संयुक्त राष्ट्रात पाकचे प्रतिनिधी मुनीर अक्रम (Munir Akram) यांनी आरोप केला होता की, भारत पाकिस्तानात दहशतवादाला प्रमोट करत आहे. एवढंच नाही तर त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून भारतासह जगाला एक प्रकारे धमकीच दिली होती. काश्मीर हा प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी एक धोका असल्याचं म्हटलं होतं. तसंच भारत काश्मीरमध्ये अत्याचार करत असल्याचं सांगत या प्रकरणी संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली होती.

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून भारतावर कल्पोकल्पित आरोप करणं हे काही नवं नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणं हा पाकिस्तानचा इतिहास आहे. लादेनसह अनेक दहशतवाद्यांना त्यांनी देशात लपवलं होतं. आपण इथं नागरिकांच्या सुरक्षेची चर्चा करत आहे, पण खरा धोका दहशतवादाचा आहे. पाकिस्तानचा भारतात मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्याशी संबंध आहे. नागरिकांवर हल्ल्याची ही सर्वात मोठी घटना होती असंही मधुसूदन यांनी यावेळी म्हटलं.

UN : दहशतवाद आणि काश्मीर मुद्यावरून भारताने पाकला पुन्हा झापलं
Video : दोन ट्रेन्समध्ये फसला घोडा! जीव वाचविण्यासाठी केले असे काही

जम्मू काश्मीर मुद्द्यावरूनही पाकिस्तानने भारतावर आरोप केले. त्याला उत्तर देताना भारताने स्पष्ट केलं की, काश्मीरचा सर्व भाग हा भारताचा अविभाज्य घटक होता, आहे आणि राहील. या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी आधी पाकिस्तानने सर्व भाग रिकामा करायला हवा. एवढंच नाहीत तर पूर्ण लडाख आणि जम्मू, काश्मीर भारताचा भाह होते, आहेत आणि राहतील. पाकिस्तानच्या प्रतिनिधींना याबद्दल काय वाटतं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आम्ही पाकिस्तानला सांगू इच्छितो की, त्यांनी काश्मीर आणि लडाखच्या ज्या भागावर अतिक्रमण केलं आहे ते काढून घ्यावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com