भारतानेच दहशतवाद पोसला; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

भारतानेच दहशतवाद पोसला; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

इस्लामाबाद : पाकिस्तानवर अनेकदा खोटे आरोप केले जात आहेत. आमच्यावर झालेल्या सर्व आरोपांवरील चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच भारताकडे कोणतेही पुरावे नसताना आमच्यावर आरोप करण्यात आले, असे पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले. तसेच भारतानेच दहशतवाद पोसला, असा आरोपही त्यांनी केला.
  
पुलवामा आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानने ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी गफूर यांनी भारतावरच आरोप केले. ते म्हणाले, 1947 पासून काश्मीरमधील जनतेवर अन्याय होत आहे. 1998 मध्ये स्वयंसरक्षणार्थ आम्ही शस्त्रे हातात घेतली. तसेच 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे आत्मघाती हल्ला झाला, त्यावेळी 8 मोठे कार्यक्रम होणार होते. पुरावे नसताना भारताकडून आमच्यावर आरोप केले जात आहेत. या उलट भारतच दहशतवाद पोसत आहे. पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही. भारताने आमच्यावर युद्ध लादले. 

तसेच ते पुढे म्हणाले, पुलवामा हल्ल्याचा आम्हाला काय फायदा मिळणार? या मुद्यावरून भारताकडून राष्ट्रीय पातळीवर आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या हल्ल्यादरम्यान  दहशतवादी ज्या वाहनामधून आला होता. ते वाहन पाकिस्तानचे नव्हतेच. सैन्य असताना सीमारेषेवर घुसखोरी अशक्य आहे. नेमके निवडणुकांवेळीच असे हल्ले का होतात?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com