Citizenship of Canada: भारत सोडून लाखो लोकांनी घेतलं कॅनडाचं नागरिकत्व; अमेरिकेनंतर भारतीयांच्या पसंतीचा दुसरा देश

या यादीमध्ये पहिलं स्थान अमेरिकेचं आहे. अमेरिकेचं नागरिकत्व घेतलेल्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.
Canada PM Justin Trudeau
Canada PM Justin TrudeauSakal

भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१८ ते जून २०२३ या कालावधीमध्ये दीड लाखांच्या आसपास भारतीयांनी कॅनडाचं नागरिकत्व घेतलं आहे. ही संख्या भारत सोडून जाणाऱ्या लोकांच्या संख्येच्या २० टक्के प्रमाणात आहे. यावरुन कॅनडा हा भारतीयांसाठी दुसऱ्या पसंतीचा देश असल्याचं आढळून येत आहे.

या यादीमध्ये पहिलं स्थान अमेरिकेचं आहे. अमेरिकेचं नागरिकत्व घेतलेल्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. कॅनडानंतर तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आणि चौथ्या स्थानावर ब्रिटन आहे. या देशांचं नागरिकत्व घेण्यासाठी भारतीय भारताचं नागरिकत्व सोडत आहेत. जानेवारी २०१८ ते जून २०२३ या काळामध्ये जवळपास ८ लाखांहून अधिक नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आहे आणि ११४ वेगवेगळ्या देशांचं नागरिकत्व घेतलं आहे.

Canada PM Justin Trudeau
India-Canada: कॅनडामध्ये दहशतवाद्यांना मिळतंय सुरक्षित आश्रय; श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा ट्रुडोंवर आरोप

भारतीय नागरिकत्व सोडलेल्या ५८ टक्के भारतीयांनी कॅनडा आणि अमेरिकेमध्ये जाणं पसंत केलं आहे. भारताचं नागरिकत्व सोडण्याचं प्रमाण दरवर्षी वाढलं आहे. पण २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे नागरिकत्व सोडण्याच्या प्रमाणामध्ये घट झाली होती. २०१८ मध्ये भारताचं नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांची संख्या सव्वा लाखांच्या जवळपास होती. ही संख्या २०२२ मध्ये २ लाखांच्याही वर गेली आहे. जून २०२३ पर्यंत जवळपास ८७ हजार भारतीयांनी परदेशी नागरिकत्व घेतलं आहे.

Canada PM Justin Trudeau
India-Canada: आधी आग लावायची अन् पुन्हा विझवायला यायचं; भारत-कॅनडा वादात अमेरिकेची मध्यस्थी?

इमिग्रेशन एक्सपर्ट विक्रम श्रॉफ यांच्या म्हणण्यानुसार, इंग्रजी भाषिक देशांमध्ये राहण्याला भारतीय पसंती देतात. श्रॉफ म्हणाले की, जीवनशैलीचा स्तर उंचावणे, मुलांचं शिक्षण, रोजगाराच्या संधी, चांगल्या आरोग्य सुविधा ही या स्थलांतराची प्रमुख कारणे आहेत. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये घर आणि नागरिकता मिळवण्यासाठीचे सोपे असलेले नियम यामुळे इतर नागरिक या देशाकडे आकर्षित होतात.

भारत कॅनडा वादामुळे वाढल्या भारतीय वंशाच्या कॅनडातल्या नागरिकांच्या अडचणी

भारत आणि कॅनडा यांच्यादरम्यान खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर हत्याकांड प्रकरणामुळे गेल्या सोमवारपासून वाद सुरू झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत सांगितलं की, निज्जर यांच्या हत्येच्या मागे भारताचा हात आहे. त्यांच्या या आरोपावर भारताने कडक प्रत्युत्तर देत कॅनडाचे आरोप फेटाळले आहेत. या आरोपानंतर कॅनडात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांची संकटं वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com