सुरक्षा परिषदेत भारताचा समावेश निश्चित

Security Council
Security Council

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्यत्वासाठी भारताचे स्थान निश्चित झाले आहे. आशिया प्रशांत गटातून भारत हा एकमेव उमेदवार असल्याने १७ तारखेला होणाऱ्या निवडणुकीत भारताच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. सुरक्षा समितीच्या रचनेत बदल करून कायमस्वरूपी सदस्यांची संख्या वाढविण्याचा भारताचा आग्रह असल्याने या नव्या कार्यकाळात भारताला आपली ही मागणी अधिक जोरदारपणे मांडण्याची संधी मिळणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सुरक्षा परिषदेतील १५ अस्थायी जागांपैकी पाच जागांसाठी १७ तारखेला मतदान होणार आहे. आशिया प्रशांत गटातून भारत आणि लॅटिन अमेरिका गटातून  मेक्सिको यांची निवड निश्चित आहे. पश्चिम युरोप आणि इतर देश या गटातील दोन जागांसाठी कॅनडा, नॉर्वे आणि आयर्लंड यांच्यात चुरस आहे तर, आफ्रिका गटातून केनिया आणि जिबुती यांच्यात लढत आहे.  २०२१-२०२२ या काळासाठी हे सदस्यत्व असेल.

१९५० पासून भारत सात वेळा सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून काम केले आहे. कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे म्हणून भारत प्रयत्नशील आहे. भारताच्या मागणीला पाठींबा मिळत असून २१ व्या शतकातील बदललेल्या भूराजकीय जगाचे प्रतिनिधित्व सध्याची रचना करत नाही, असा दावा करणाऱ्या देशांची संख्या वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com