भारताकडून रोहिंग्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

rohingya
rohingya

नवी दिल्ली : म्यानमारच्या राखीन प्रांतातील 3000 रोहिंग्या कुटुंबीयांसाठी भारताकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. भारताच्या या मदतीमुळे तेथील नागरिकांना याचा फायदा झाला.

गेल्या अनेक दिवसांपासून म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांचा मुद्दा गाजत आहे. त्यांना म्यानमारसह अन्य देशाचे नागरिकत्व देण्याबाबत अद्याप कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, भारताने म्यानमारच्या रोहिंग्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून 3000 रोहिंग्या कु़टुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे.

"भारतीय नागरिकांकडून रोहिंग्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या मदतकार्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात आली. राखीन प्रांतातील निर्वासित 3000 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये तांदूळ, तेल, मीठ, साखर, साबण अशाप्रकारच्या वस्तू देण्यात आल्या आहेत,'' अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करून दिली. 

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात झालेल्या हिंसाचारानंतर म्यानमारमधील 6 लाखांहून अधिक रोहिंग्यांनी बांगलादेशात पलायन केले होते. म्यानमारमधील अल्पसंख्यांक रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारचे नागरिकत्व दिले गेले नाही. त्यानंतर बांगलादेशाने त्यांना शरणार्थी म्हणून दर्जा दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com