
Shehbaz Sharif: पाकिस्तानसोबतचा सध्याचा संघर्षाचा काळ भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण काश्मीरच्या वादावर यामुळं तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. याला कारण ठरलंय पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं एक विधान. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी गुरुवारी सांगितलं की भारतासोबत शांतता चर्चेत सहभागी होण्यास आपण तयार आहोत. यामध्ये काश्मीर वाद आणि पाणी वाटप यांसह द्विपक्षीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताला व्यापक चर्चेसाठी त्यांनी आमंत्रित केलं आहे.