Bhupendra Yadav : वाघांचे संरक्षण केल्यास मानवाचे भवितव्य सुरक्षित पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांचे ‘आयबीसीए’त प्रतिपादन!

COP30 Brazil : ज्या ठिकाणी वाघ, बिबट्या आदी वन्यप्राण्यांचे अस्तित्व आढळते, तेथील जंगले अधिक समृद्ध असतात, तिथे गवताळ प्रदेश पुन्हा निर्माण होतात, जलप्रणाली कार्यरत असते आणि कार्बन कार्यक्षमरीत्या साठविला जातो.
Bhupender Yadav Highlights Climate Biodiversity Link at IBCA

Bhupender Yadav Highlights Climate Biodiversity Link at IBCA

Sakal

Updated on

बेलेम (ब्राझील) : वाघ, बिबट्या, चित्त्यांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन भारताने जागतिक नेत्यांना केले. या प्रजातींचे भविष्य सुरक्षित केल्यास मानवजातीसाठी सुरक्षित आणि दीर्घकालीन जीवन सुनिश्चित होईल, अशी भूमिकाही भारताने मांडली. येथे सुरू असलेल्या हवामान परिषदेत (सीओपी ३०) ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ (आयबीसीए) उच्चस्तरीय मंत्रिगटाला पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केले. वाघ, बिबट्या आदींच्या संख्येतील घटीमुळे संपूर्ण पर्यावरणसंस्थाच अस्थिर होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com