United Nations
United NationsSakal

सावधगिरी बाळगा, नाहीतर पुन्हा धोका; संयुक्त राष्ट्राचा भारताला इशारा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत संयुक्त राष्ट्रांनी भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये भारतात दोन लाख चाळीस हजार लोकांना प्राण गमवावे लागले होते आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले होते. ‘ओमिक्रॉन’बद्दल सावधगिरी न बाळगल्यास तशीच परिस्थिती उद्भवू शकते, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. (Corona And Omicron Variant Updates)

कोरोना संकटानंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविणारा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक आर्थिक परिस्थिती अहवाल आज प्रकाशित झाला. या अहवालानुसार, भारतातील परिस्थिती गेल्या वर्षीसारखी राहण्याची शक्यता असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पूर्वीप्रमाणेच नुकसान होण्याची भीती असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात, मागील वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएन्टमुळे हाहाकार उडाला होता.

United Nations
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय

जगावरही परिणाम होणार

ज्या प्रकारे ओमिक्रॉनचा संसर्ग फैलावत आहे, त्याचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम होणे अटळ आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी सर्वांना लस देण्यापासून ते इतर उपाययोजनांबाबत वैश्विक दृष्टीकोन बाळगला नाही तर या संसर्गाचा उपद्रव कमी होणार नाही. दक्षिण आशियामध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने नवे व्हेरिएन्ट येण्याची आणि त्यामुळे परिस्थिती बिकट होण्याचे भाकितही या अहवालात वर्तविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com