

Overcome Anxiety
esakal
गुरुदेव श्री श्री रविशंकर
तुम्ही तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही ज्या परिस्थितींची चिंता केली होती, त्यापैकी बहुतेक परिस्थिती खऱ्या झाल्याच नाहीत. एका अभ्यासात आढळून आले आहे, की तुमच्या ८५ टक्के चिंता कधीही प्रत्यक्षात घडत नाहीत! तुमच्या स्वतःच्या मनाचीच निर्मिती असलेला हा भ्रम तुमचा आनंद झाकोळून टाकतो आणि मन बोजड करतो, त्याला माया म्हणतात. हे माहीत झाल्यानंतरही तुमचे मन अजूनही सततची चिंता आणि भीतीमध्ये गुरफटले असेल, तर मी त्या थांबवण्यासाठी पाच मार्ग सांगतो.