Ayurveda : एकावेळी 10 रोगांचा नाश करतो आयुर्वेदातला हा सोपा उपाय, फक्त तुपाचा असा वापर करा

आयुर्वेदात हा उपाय खांद्याच्या वरच्या बाजूस होणाऱ्या विकारांवर उत्तम मानला जातो.
Ayurveda
Ayurvedaesakal

Ayurveda : आयुर्वेद ही हजारो वर्षे जुनी वैद्यकीय प्रणाली आहे ज्यामध्ये आयुर्वेदिक औषधे आणि उपायांद्वारे रोगांवर वेगवेगळ्या प्रकारे उपचार केले जातात. यातीलच एक उपचार पद्धती म्हणजे नस्य (Nasya) ही आहे. आयुर्वेदात हा उपाय खांद्याच्या वरच्या बाजूस होणाऱ्या विकारांवर उत्तम मानला जातो.

आयुर्वेदात म्हटले आहे की 'नासा ही शिरसो द्वारं' म्हणजे नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. डोके, तोंड, केस, दात, कान, नाक, डोळे आणि एकूणच आरोग्याशी संबंधित सर्व विकारांवर नाकाद्वारे उपचाराची पद्धत आयुर्वेदात सांगितली आहे.

नाकातून तुप टाकणे

आयुर्वेदिक उपायामध्ये नाकात तूप टाकण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. असे मानले जाते की दिवसातून दोनदा नाकात तूप टाकल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांपासून आराम मिळतो. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी नास्य उपचाराचे काही फायदे सांगितले आहेत. ते कोणते ते आज आपण जाणून घेऊया.

Ayurveda
Ayurveda: आयुर्वेदानुसार अन्न आणि भावना यांत नेमका काय संबंध आहे?

नस्य उपाचर पद्धत म्हणजे काय?

डॉक्टरांनी सांगितले की, गाईच्या तुपाचे दोन थेंब सकाळी आणि रात्री नाकात टाकण्याला प्रतिमर्ष नस्य म्हणतात. हा उपाय कोणालाही करता येईल.

नाकात तुप टाकण्याचे फायदे

हा आयुर्वेदिक (Ayurveda) उपाय चांगली झोप, डोकेदुखी (तणाव, मायग्रेनमुळे) आराम करण्यास, त्वचा चमकण्यास, प्रतिकारशक्ती आणि स्मरणशक्ती सुधारण्यास, ऍलर्जी कमी करण्यास, मानसिक आरोग्य सुधारण्यास, केस गळणे आणि केस पांढरे होण्यापासून बचाव करण्यास, तणाव कमी करण्यास, घोरणे कमी करण्यास मदत करते. आणि मेंदूचे पोषण करते.

Ayurveda
Ayurveda Tips:आयुर्वेदानुसार दूधासोबत चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नये...

नस्य उपाचर पद्धतीने ऑटो इम्यून डिसॉर्डरमध्येही बराच आराम मिळतो. ऑटो इम्यून थायरॉईड, संधिवात, मल्टिपल स्क्लेरोसिस ग्रस्त लोकांना या उपायाचा खूप फायदा होतो. यामुळे तुम्हाला तणाव, डोकेदुखी, उष्णता थकवा, केस गळणे, अंधुक दृष्टी, निद्रानाश इत्यादीपासून आराम मिळू शकतो.

नाकात कधी आणि किती तुप टाकावे?

डॉक्टरांनी सांगितले की सकाळी किंवा रात्री झोपताना कापूस, ड्रॉपर किंवा करंगळीच्या साहाय्याने दोन्ही नाकपुड्यांमध्ये गाईच्या तुपाचे फक्त 2 थेंब टाकावेत.

डिस्क्लेमर : वरील लेख सामान्या माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com