मनाची शक्ती : शारीरिक आणि मानसिक स्वच्छता

आपण मागील दोन भागात अंघोळ करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेत नाही, याची माहिती घेतली. यात अजून काही घटक आहेत.
Physical and mental hygiene
Physical and mental hygienesakal
Summary

आपण मागील दोन भागात अंघोळ करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेत नाही, याची माहिती घेतली. यात अजून काही घटक आहेत.

- डॉ. हंसा योगेंद्र

आपण मागील दोन भागात अंघोळ करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेत नाही, याची माहिती घेतली. यात अजून काही घटक आहेत.

जेवणानंतर लगेच अंघोळ करणे

जेवल्यानंतर लगेच अंघोळ केल्याने पचनास त्रास होतो. कारण पोटाभोवतीचे रक्त शरीराच्या इतर अवयवांमध्ये वाहू लागते. आयुर्वेदानुसार प्रत्येक क्रिया एका विशिष्ट कालावधीत केली जाते. चुकीच्या वेळी ती केल्यास शरीराला खरोखर हानिकारक ठरू शकते. पचन प्रक्रियेत मदत करण्यासाठी अन्न खाल्ल्यास शरीरातील अग्नितत्त्व सक्रिय होते. अंघोळ केल्यावर शरीराचे तापमान कमी होते आणि पचनक्रिया मंदावते, असा आयुर्वेदाचा विश्वास आहे. तुम्ही अंघोळ केल्यानंतर शरीराचे तापमान कमी होते. शरीर थंड होऊ लागल्याने, पचनास मदत करण्यासाठी प्रमाणित तापमान राखण्यासाठी त्याला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे अपचन होऊ शकते.

त्यामुळे खाल्ल्यानंतर किमान दोन तासांनी अंघोळ करणे श्रेयस्कर. खाण्यापूर्वी अंघोळ करणे अधिक चांगले आहे. कारण यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटते आणि पचनशक्ती वाढते.

व्यायामानंतर लगेच अंघोळ करणे

वर्कआउटनंतर किमान २० मिनिटे शरीर थंड होणे महत्त्वाचे आहे. काही हलके स्ट्रेच करा आणि तुमच्या शरीराला विश्रांतीच्या स्थितीत परत येऊ द्या. हे तुमचे हृदय गती आणि शरीराचे तापमान सामान्य करण्यात मदत करते. पाणी किंवा फळांच्या रसाने स्वतःला हायड्रेट करा. घाम येणे थांबल्यावर अंघोळ करू शकता. तुम्ही नियमितपणे आसन करत असल्यास योगाभ्यासाच्या आधी अंघोळ करणे चांगले. त्यामुळे शरीर अधिक लवचिक होऊन अवघड आसनस्थिती करणे सहज साध्य होते.

योगातील पहिला नियम म्हणजे ‘विचार.’ म्हणजे. आंतरिक, बाह्य आणि मानसिक स्तरावरील स्वच्छता. ती आपल्याला स्वतःला करायची आहे. आपण बाहेरून कितीही स्वच्छ असलो. तरी आपल्या मनात वाईट विचार असले, तरी त्याचा विषारी प्रभाव मनावर नक्कीच होतो. अंतर्गत तसेच बाह्य स्वच्छता पाळणे महत्त्वाचे आणि आवश्यक आहे.

अंघोळ केल्यावर माणसाने किमान दहा मिनिटे शांतपणे बसावे आणि कोणतीही क्रिया करू नये. तुम्ही शवासन करू शकता, शांतपणे बसू शकता किंवा प्रार्थना करू शकता. त्यामुळे पुढील अंतर्गत शुद्धीकरण होऊ शकेल. देव तुमच्या पाठीशी आहे हा आत्मविश्वास देखील तुम्हाला मिळतो आणि तुम्हाला वाटते की सर्व काही ठीक होईल. अशा भावनेने आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com