वसा आरोग्याचा : महिला आणि हिमोग्लोबिन

गणेशोत्सवानिमित्त आमच्या सोसायटीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदानापूर्वी वजन आणि हिमोग्लोबिन तपासले जाते.
women hemoglobin
women hemoglobinsakal

- डॉ. कोमल बोरसे

गणेशोत्सवानिमित्त आमच्या सोसायटीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदानापूर्वी वजन आणि हिमोग्लोबिन तपासले जाते. उंचीनुसार वजन योग्य असावे तसेच दुसरा सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन १२ पेक्षा जास्त असावे. तपासणीअंती आम्हाला लक्षात आले की अनेक पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण व्यवस्थित होते.

परंतु ९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ पेक्षाही कमी होते, त्यामुळे रक्तदान करू शकल्या नाही. महिलांचे हिमोग्लोबिन पुरुषांपेक्षा कमीच असते. परंतु आहार व्यवस्थित ठेवून जीवनशैली सुधारून हिमोग्लोबिनचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकतो.

आता बरेच लोक म्हणतील आम्ही तर व्यवस्थित आहार घेतो, भरपूर लोह असणाऱ्या गोष्टी खातो, अगदी मांसाहार करतो तरीही आमचे हिमोग्लोबिन कायम कमीच असते. एखादा पदार्थ आपण खाल्यावर लगेच त्याचा फायदा होत नाही. त्याचा फायदा होण्यासाठी अन्य अनेक गोष्टी कारणीभूत असतात. महत्त्वाचे म्हणजे तुमची पचनक्रिया कशी आहे? त्यामध्ये काही बिघाड असल्यास अन्न नीट पचणार नाही.

त्याच्यामुळे अन्नातील पोषक घटक शरीरामध्ये घेतली जाणार नाहीत. म्हणजे पोषण तत्त्व शरीरात योग्य पद्धतीने शोषले जाणार नाही. म्हणजेच तुम्ही लोहयुक्त आहार घेत आहे; परंतु त्यातील लोह तुमच्या रक्तामध्ये जात नसल्यामुळे तुमचा हिमोग्लोबिन वाढत नाही.

दुसरे कारण म्हणजे चहा, कॉफी, अल्कोहोल याच्या सेवनाचे प्रमाण जास्त असल्यास या गोष्टी असलेल्या टॅनिन आणि कॅफेन, तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होऊ देत नाही. मग ते फक्त लोहच नाही तर दुसरी व्हिटॅमिन्सही असू शकतात. त्यामुळे रक्तामध्ये कोणत्याही पोषक तत्त्वाची कमतरता असल्यास चहा, कॉफी, अल्कोहोल बंद करावे.

अनेक लोक चहा-कॉफी सोबत नाश्ता किंवा संध्याकाळचा नाष्टा म्हणजे स्नॅक घेतात हे चुकीचे आहे. तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा वापर तुमच्या शरीरासाठी होणार नाही; फक्त चरबी वाढेल परंतु पोषक तत्त्व वाढणार नाहीत. तिसरे कारण म्हणजे पूर्वीपासून आपल्याकडे पोहे आणि लिंबू हे ठरलेले कॉम्बिनेशन आहे. याचे कारण असे की लोखंडी कढईत पोहे करत.

त्यामुळे त्यामधील लोहाचे प्रमाण वाढायचे आणि लिंबू हे व्हिटॅमिन ‘सी’युक्त असते आणि लोहाला शोषण्यासाठी ते महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे. केवळ लिंबाबरोबरच तुम्ही संत्रे, मोसंबी, आवळा, पेरू हेही व्हिटॅमिन ‘सी’ युक्त आहेत. परंतु ही फळे बारा महिने उपलब्ध नसतात. त्यामुळे आपण कोणतेही जेवण ग्रहण करत असू मग ती पालेभाजी असो, मांसाहार असो आपल्या जेवणामध्ये रोज लिंबूचा वापर करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com