Health Tips : फळं खाल्यानंतर पाणी प्यावे का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

अनेकदा तुम्ही तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांना फळं खाल्यानंतर पाणी पिऊ नये असे सांगताना ऐकले असेल.
Health Tips
Health TipsSakal

Health Tips : अनेकदा तुम्ही तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांना फळं खाल्यानंतर पाणी पिऊ नये असे सांगताना ऐकले असेल. साधारण फळं खाल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे असे सांगितले जाते. फळं खाल्यानंतर पाणी न पिण्यामागे अनेक शास्त्रीय कारणे आहेत. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने नेमके आरोग्यावर कोणते परिणाम होतात तसेच कोणती फळे खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Health Tips
Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?ध्यान, प्राणायाम व योगसाधनेविषयी जाणून घ्या सगळं

का पिऊ नये फळे खाल्यानंतर पाणी?

तज्ज्ञांच्या मते फळांमध्ये फ्रक्टोज म्हणजेच नैसर्गिक साखर असते, त्यामुळे फळे खाल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पोटाशी संबंधित त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे फळे खाल्ल्यानंतर किमान 1 तास आधी किंवा 1 तासानंतर पाणी प्यावे. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने अन्न नीट पचत नाही, त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

Health Tips
Swasthyam 2022 : मानसिक फिटनेस योगाच्या माध्यमातून कसा साधला जाऊ शकतो?

कोणती फळे खाल्ल्यानंतर पिऊ नये पाणी

केळी : तज्ज्ञांच्या मते, केळी खाल्ल्यानंतर पाणी पिणे अयोग्य आहे. केळी खाल्ल्यानंतर पाणी, विशेषतः थंड पाणी पिल्याने अपचन होऊ शकते. याला इनडाइजेशन असेही म्हटले जाते. वास्तविक, केळी आणि थंड पाण्यातील गुणधर्म सारखेच असतात. ते एकाचवेळी शरीरात गेल्याने अपचनाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटांनीच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पेरू : अनेकदा पेरू खाल्ल्यानंतर खूप तहान लागते आणि त्यामुळे अनेकजण गटागटा पाणी पितात. परंतु असे करणे हानिकारक ठरू शकते. यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते.

Health Tips
Soil Health Card Scheme : मोदी सरकारने आणलंय Soil हेल्थ कार्ड; जाणून घ्या मृदा हेल्थ कार्डचे फायदे

काकडी आणि टरबूज : काकडी आणि टरबूज ही फळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त अशी ओळखली जातात, परंतु जर तुम्ही काकडी आणि टरबूजचे सेवन केल्यानंतर लगेचच भरपूर पाणी प्यायले तर, पोट खराब होऊन लूज मोशनची समस्या जाणवू शकते.

संत्री, अननस आणि द्राक्षे : सायट्रिक ऍसिड असलेली फळांमध्ये आधीपासूनच पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे संत्री, अननस आणि द्राक्षांसारखी पाणीदार फळं खाल्यानंतर पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील पीएच पातळी बिघडू शकते. यामुळे अपचन सारखी समस्या उद्भवू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com