लठ्ठपणा, मधुमेह अकाली अंधत्वास कारणीभूत : जाणून घ्या

जागतिक मेंदू सप्ताह : मेंदूरोग तज्ज्ञांनी मांडले शास्त्रीय निरीक्षण
Health Updates
Health Updates

नागपूर - केवळ मोतीबिंदूमुळेच अंधत्व येवू शकते. त्यामुळे लोक बिनधास्त राहतात. परंतु बेफिकिर सवयींमुळे उद्भवणारे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलपणा हेही चोर पावलांनी तुम्हाला अंधत्वाकडे नेत असतात असे चिंताजनक तत्थ्य जगातील मेंदूरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. आतापर्यंत मोतीबिंदू हेच अंधत्वाचे मोठे कारण आहे, असा समज होता. वास्तविक हे अंधत्व संथ गतीने येते. मात्र चोर पावलांनी दस्तक देणारा मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलपणामुळे मेंदूतील डोळ्यांच्या वाहिन्यांमध्ये अवरोध निर्माण करतात, यामुळे अकाली अंधत्वाचे प्रमाण वाढत असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या पुढे आले आहे.

जागतिक मेंदू आरोग्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर इंडियन अकादमी ऑफ न्यूरॉलॉजी आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीने ७ दिवसाच्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. सत्राच्या तिसऱ्या दिवशी मेंदूतील असंतुलनामुळे येणारे अंधत्व आणि भोवळ या विषयावर चर्चा झाली. डॉ. निर्मल सुर्या, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. विवेक लाल, डॉ. मोनिका सिंग, डॉ. आस्था, डॉ. सुजितकुमार चर्चेत सहभागी झाले होते.

अपुरी झोपही कारणीभूत

मोतीबिंदूमुळेच अंधत्व येत नाहीतर लठ्ठपणा हा नव्या जीवनशैलीचा मोठा शत्रू आहे. यामुळे मेंदूतील डोळ्यांच्या नसांवर सूज येते. मेंदूवरचा दबाव वाढतो. व्यायामाचा अभाव यामुळे दृष्टीच्या नसांवर दबाव वाढतो. दृष्टी जाण्याची भीती आहे.

-डॉ. आस्था, मेंदूरोग तज्ज्ञ

मोबाईल स्क्रीन धोकादायक

पालकांनी स्वतःच्या सवयी आधी बदलल्या पाहिजे. घरातला टीव्ही आणि मोबाईलचा कालावधी कमी करणे काळाची गरज आहे. मद्यपान आणि धूम्रपान हे देखील दृष्टी जाण्याचे प्रमुख कारण आहे. संगणक, मोबाईल स्क्रीनमुळे मुलांचे बुबुळ आकुंचन पावते.

-डॉ. विवेक लाल, मेंदूरोग तज्ज्ञ

गरोदरपणातही जोखीम

मधुमेह, उच्चरक्तदाब आणि जुन्या आजारांचा इतिहास असलेल्या महिलांमध्ये गरोदरपणात अंधत्वाची जोखीम वाढते. मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अवरोध निर्माण झाला अंधत्वाची जोखीम वाढते. क्षयरोगातही दिल्या जाणाऱ्या इथॅमबूटॉल औषधांमुळे डोळ्यांच्या नसांवर परिणाम होऊन दृष्टी कमी होते. कोरोना उपचारादरम्यान स्टेरॉईडमुळे काळ्या बुरशीचा संसर्गानंतर दृष्टी गेल्याची प्रकरणे पुढे आली.

-डॉ. मोनिका सिंग, मेंदूरोग तज्ज्ञ

सतत खाली मान घातक

हल्लीची पिढी स्मार्ट आहे. मात्र त्यांचा टीव्हीवरील स्क्रीन टाइम कमी झाला. मात्र मोबाईलवरचा वाढला. यामुळे त्यांच्या मेंदूचे आरोग्य बिघडत आहे. मेंदूतील केंद्र मानेशी निगडित असतात. सतत खाली मान आणि बोटांची मोबाईलवरची हालचाल धोकादायक बनली असल्याने मेंदूचे संतुलन बिघडते.-डॉ. सुजित कुमार, मेंदूरोग तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com