Post Wedding Life : लग्नानंतर अचानक जोडप्यांचं वजन का वाढू लागतं? तुमचंही वजन वाढलं काय?

खरंच लग्नाच्या आनंदामुळे वजन वाढतं की यामागे आणखी काही कारणं आहेत?
Post Wedding Life
Post Wedding Lifeesakal

Post Wedding Life : बहुतेक नवविवाहित जोडप्यांना लग्नानंतर एका खास आव्हानाचा सामना करावा लागतो.ते आव्हान म्हणजे वजन वाढण्याचं आव्हान. लग्नाच्या आनंदात लठ्ठपणा वाढला आहे, असा विनोद अनेकदा केला जातो. याचे खरे कारण काय आहे याची कल्पना मात्र तुम्हाला आहे काय? खरंच लग्नाच्या आनंदामुळे वजन वाढतं की यामागे आणखी काही कारणं आहेत?

1. लग्नाची गडबड

लग्नाआधी सर्व मुलं-मुली आपला फिटनेस टिकवण्यासाठी आपल्या आहारावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतात. वर्कआउट, वॉकिंग आणि योगासने करतात. जेणेकरून तुम्हाला तुमच्या लग्नाच्या दिवशी तुमचा उत्तम लुक मिळेल. पण लग्नाच्या विधी सुरू होताच स्वत:साठी वेळ काढणे कठीण होऊन बसते आणि ही प्रक्रिया लग्नानंतर जवळपास एक महिना या ना त्या कारणाने सुरू राहते, त्यामुळे नवीन जोडपे स्वत:कडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि वजन वाढू लागते.

2. हाय फॅट पदार्थांचं सेवन

लग्नादरम्यान आपल्याकडे अनेक विधी होतात आणि प्रत्येक विधीमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात, ज्यासाठी भरपूर तूप, तेल आणि साखर वापरली जाते. हे सर्व पदार्थ चरबी वाढवणारे आहेत.

3. जेवणाची आमंत्रणं

लग्नानंतर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि जवळचे मित्र नवविवाहित जोडप्याला त्यांच्या घरी आमंत्रित करतात. या दरम्यान, लंच किंवा डिनरमध्ये खाल्लेले अन्न देखील चरबी वाढवते. हेसुद्धा लठ्ठपणाचे कारण ठरू शकते.

Post Wedding Life
Weight Loss Diet : अति खाण्यानेच नव्हे तर थायरॉइडनेही वाढते वजन, असे ठेवा नियंत्रणात

4. तीव्र थकवा आणि झोपेची कमतरता

लग्नाच्या खरेदीपासून ते पूर्वतयारीपर्यंत आणि त्यानंतर लग्नाच्या फंक्शन्सपर्यंत... नवीन जोडपे खूप थकतात. कधी-कधी संगीत समारंभ, मेहेंदी, हळदी विधी यामुळे रात्री उशिरापर्यंत जागावे लागते. यामुळे त्यांना झोप येत नाही आणि झोप पूर्ण झाली नाही तर अंग फुगणे सुरू होते, त्यामुळे जोडप्याच्या अंगावरील चरबी वाढते. (weight Gain)

Post Wedding Life
Summer Honeymoon : उन्हाळ्यात हनिमूनसाठी उत्तम आहेत ही ठिकाणे

5. हनिमून ट्रिप

वैवाहिक जीवनाचा थकवा आल्यावर हनिमून ट्रिपमध्येही प्रवास, हॉटेल आणि रेस्टॉरंटचे जेवण, हार्मोनल बदल. ही सर्व कारणे आहेत ज्यामुळे शरीराचे वजन लवकर वाढते. ही सामान्य कारणे आहेत ज्यामुळे बहुतेक वधू-वरांना लग्नानंतर लठ्ठपणाची समस्या उद्भवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com