World Mental Health Day : मानसिक सुदृढतेसाठी साथ संवादाची

प्रबोधनाची गरज ठळक; तणावामुळे वाढतेय समस्या
World Mental Health Day
World Mental Health Dayesakal

कोल्हापूर : १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो.  याविषयी उघडपणे बोलायला समाज आजही तयार नाही. वाढत्या ताण-तणावामुळे तरुणांची बिघडती मानसिकता ही देशासमोरील मोठी समस्या म्हणून उद्भवू शकते. यावर मात करण्यासाठी संवाद वाढविण्याबरोबरच समाजात प्रबोधनाची गरज ठळक बनत आहे.

World Mental Health Day
World Mental Health Day : कोरोनानंतर मानसिक आजारांत 25 टक्‍यांपर्यंत वाढ

वाढत्या अपेक्षा, स्पर्धा, रोजगाराची असुरक्षितता, बेरोजगारी, कुटुंब व करिअरमधील वाढते ताण, बदललेले  नाते संबंध, धकाधकीमुळे वाढणारे नैराश्य व ताण, कोरोनानंतर निर्माण झालेली परिस्थिती अशी अनेक कारणे सध्या तरुणांमध्ये मानसिक संतुलन बिघडवणारी ठरत आहेत. यावर अनेक उपचार उपलब्ध असूनही मानसिक आरोग्याची फारशी दखल घेतली जात नसल्याने, या आजाराची व्याप्ती वाढत आहे.

World Mental Health Day
Health: इअरफोनमुळे होऊ शकतो हृदयविकार! जाणून घ्या प्रमुख तोटे

मानसिक आजाराचे गांभीर्य आणि वाढते प्रमाण लक्षात घेऊन, केंद्र शासनाने मानसिक आरोग्य सेवा या सामान्य आरोग्य सेवा-सुविधांचा अविभाज्य भाग मानून दुर्गम, ग्रामीण भागातील लोकांना त्या उपलब्ध करून देण्यासाठी ऑगस्ट १९८२ मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला, मात्र इतक्या वर्षांनंतर आजही  या कार्यक्रमास गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही.

World Mental Health Day
Health news : अपघातात जखमी रुग्णाला 3 शस्त्रक्रियांद्वारे जीवनदान

भारतात दोन कोटी लोकांना सेवा देण्यासाठी १५ ते २० हजार मानसोपचार तज्ज्ञांची गरज असताना, केवळ चार हजार पेक्षाही कमी मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. आजाराचे वेळेवर निदान, उपचारांनी आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सक्षम करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 

उत्तम मानसिक आरोग्यासाठी

- मित्र परिवारामध्ये प्रत्यक्ष रमा  उत्तम आहार विहार व आरोग्य

- सांभाळा  किमान सात तास झोप घ्या  स्वतःचा छंद जोपासा 

- दिवसातील हार-जीत स्वकियांशी चर्चा करा वर्षातून एकदा

- मेंटल हेल्थ तपासणी करून घ्या

World Mental Health Day
Health: अशी ठेवा हाय ब्लड शुगरची समस्या दूर!

मानव हा सामूहिक प्राणी आहे. सध्या या समूहातूनच  विलग होण्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रत्येक समस्येवर उपाय असतो, हा उपाय शोधण्यासाठी व आधार देण्यासाठी सोबत आप्तस्वकीयांची साथ हवी असते. सध्या वाढत्या मानसिक समस्या ही संवाद तुटल्याचे परिणाम आहेत.   

- डॉ. अश्विन शहा, मानसोपचार तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com