जळगाव : दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येत आहे. त्यामुळे हतनूरचे ३० दरवाजे उघडण्यात आले. (Latest marathi news)
मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थान परिसरात तसेच विदर्भातही पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा वाढला आहे. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्याने हतनूर धरणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे धरणाचे सकाळी ११ वाजेपर्यंत ३० दरवाजे प्रत्येकी एका मीटरने उघडण्यात आले. त्यातून ४२ हजार ३०० क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने रात्री केवळ २४ बंद करून ६ दरवाजातून साडेआठ हजार क्युसेकने विसर्ग सुरु होता. प्रशासनाच्यावतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.