जळगाव - ‘जामनेर तालुक्यातील बेटावद येथील तरुणाची अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. यात मंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनावरील चालकाच्या मुलगा सूत्रधार असून यात भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी आहेत. त्यामुळे या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देणार का?,’ असा सवाल आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केला.