मेहुणबारे (जि. जळगाव) :येथील चाळीसगाव ते धुळे महामार्गावर रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच विविध कारणांनी रस्ता आपघातात सात महिन्यात चौदा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यात अनेक जण जखमी झाले आहेत. या रसत्यावरील खड्डे आजही पाहीजे तसे बुजविले गेले नसल्याने आपघाताचे प्रमाण वाढले आहे. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जरी सुरू असले तरी हा महामार्ग होईल तेव्हा होईल, मात्र खड्डे तरी व्यवस्थित बुजवा, अशी मागणी होत आहे. (Chalisgaon Dhule highway of death 14 people died in 7 months accident case jalgaon latest Marathi news)
चाळीसगाव- धुळे महामार्गावर खूपच खड्डे पडले आहेत. गिरणा नदीच्या पुलावरच मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यावर रोज एकतरी अपघात होण्याचे नित्याचे झाले आहे. खड्ड्यांचे थातूरमातूर काम केले.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने त्यामुळे खड्डे बुजविताना काही खड्डे सोडून देण्यात आले आहे. रस्त्यावर पुन्हा लहान मोठे खड्डे दिसू लागले आहेत. ज्या खड्ड्यांमध्ये सध्या थोडाफार शिल्लक असलेला मातीमिश्रीत मुरुम दुचाकी चालकांच्या डोळ्यात जात असल्याचे डोळ्यांना देखील इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौदा जणांचा मृत्यू
अत्यंत रहदारीच्या असलेल्या चाळीसगाव - धुळे व मालेगाव - चाळीसगाव या महामार्गावर तब्बल जानेवारी ते जुलैदरम्यान १४ जणांनी रस्ते आपघातात आपला जीव गमावला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, तसेच अनेक चालक मद्यप्राशन करून वाहने चालवितात.
तर अनेकदा रात्रीच्या सुमारास चालकाला झोपेची डुलकी आल्यानंतर हे आपघात होत आसतात. यामुळे रस्त्यावरील धोकेदायक खड्डे तरी बुजवावेत अशी मागणी होत आहे.
खड्डे बनले जीवघेणे
चाळीसगाव -धुळे रस्त्यावर खड्ड्यांच्या संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेत खड्डे बुजविले. मात्र हे खड्डे बुजविताना काही बुजविले तर काही खड्डे सोडून दिले. गिरणा पुलादरम्यान काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान खड्डे पडले आहेत. ज्यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. जन व जुलै महिन्यात सहा जणांनी आपला जीव गमावला असल्याची नोंद मेहुणबारे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
"पावसाळ्यात रस्त्यावरील ओलाव्यामुळे वाहन घसरण्याची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे वेगाने गाडी चालविण्याचा मोह टाळावा. घाईगर्दीमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहन चालविताना खबरदारी घेणे गरजेचे आहे."
- विष्णू आव्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.