भारत-बांगलादेशच्या 'या' करारात चाळीसगावच्या शिक्षकाचा सिंहाचा वाटा

भारत-बांगलादेशमधील टेलिकम्युनिकेशन कराराचे चाळीसगाव कनेक्शन
भारत-बांगलादेशच्या 'या' करारात चाळीसगावच्या शिक्षकाचा सिंहाचा वाटा
Summary

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील आश्रम शाळेचे शिक्षक सुनील मोरे यांनी दिले. यांचा नुसता चाळीसगाव तालुक्याला नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव- जळगाव) : भारताने जागतिकीकरण स्वीकारले आणि भारतातील बुद्धीचा जगाला देखील उपयोग होऊ लागला. अनेक देशांचे विविध पातळीवर करार होऊ लागले. त्यातच भारत आणि बांगलादेशाचे टेलिकम्युनिकेशन संदर्भातील करार झाले. यात महत्त्वाचे योगदान मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील आश्रम शाळेचे शिक्षक सुनील मोरे यांनी दिले. यांचा नुसता चाळीसगाव तालुक्याला नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नाते कसे आहे. राजकीय पटलावर काय चर्चा करतात? यापेक्षा आपल्या बुद्धीचा वापर करून या दोन्ही देशाचे कम्युनिकेशन चांगले करता येऊ शकते का? या तांत्रिक कामासाठी मोरे यांनी स्वतःच्या बुद्धीचा कस लावला असल्याचे हे येथे महत्त्वाचे ठरते. (chalisgaon teacher sunil more contributed to the agreement on telecommunications between India and Bangladesh)

भारत-बांगलादेशच्या 'या' करारात चाळीसगावच्या शिक्षकाचा सिंहाचा वाटा
जळगाव शहरासाठी दिलासा; महापालिकेचे कोविड सेंटर तात्पुरते बंद

स्वीडन येथील इको ट्रेनिंग सेंटर, नाशिकच्या विद्या प्राधिकरण, बांगलादेशाच्या इलमेंट्री एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमानाने भारत बांगलादेश टेली कोलेबोरेशन प्रकल्प २०२१ हा नुकताच राबविण्यात आला. या प्रकल्पात आनुदानित आदिवासी माध्यमिक विद्यालय मेहुणबारे येथील उपक्रमशील शिक्षक सुनिल मोरे यांनी ऑनलाईन सहभाग घेऊन त्यांच्या सोबत बांगला देशातील शिक्षक मिजनुर रहेमान व पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन माहिती जाणून घेतली.

भारत-बांगलादेशच्या 'या' करारात चाळीसगावच्या शिक्षकाचा सिंहाचा वाटा
जळगाव जिल्ह्यात संचारबंदीची ‘ऐशीतैशी’

व्हिडीओच्या साहाय्याने प्रझेटेशंन

भारत व बांगलादेशातील सहभागी शिक्षकांनी आपापल्या देशातील सांस्कृतिक, औद्योगिक, ऐतिहासक व शैक्षणिक माहितीचे पाँवरपाँईंट प्रझेटेशंन फोटो, व्हिडीओच्या साहाय्याने अदान प्रदान केले. युनायटेड नेशन्स आँर्गनायझेशन (युनो) ठरवून दिलेल्या १७ शाश्वत विकासाच्या ध्येय बाबतीत जागरूकता निर्माण व्हावी हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

भारत-बांगलादेशच्या 'या' करारात चाळीसगावच्या शिक्षकाचा सिंहाचा वाटा
जळगाव जिल्ह्याला मिळाल्या ३८ हजार ५०० लशी!

शुध्द पाण्याची उपलब्धतेवर चर्चा

या प्रकल्पाच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या १७ ध्येयांपैकी भुक निर्मूलन, दारिद्र निर्मूलन, चांगले आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शुध्द पाण्याची उपलब्धता,आणि सांडपाण्याची व्यवस्था, असमनता कमी करणे या विविध महत्त्वाच्या मुद्यांवर १६ सत्रामध्ये ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले व प्रकल्प पुर्ण करण्यात आला. या प्रकल्पात राष्ट्रीय समन्वयक नाशिक डायटचे प्रा. योगेश सोनवणे, वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक प्रा.भरत शिरसाट, यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्प यशस्वी झाल्याबद्दल श्री. मोरे यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव विजय चौधरी यांनी कौतुक केले तर मुख्याध्यापक मुकेश चौधरी व वैभव चौधरी यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com