जळगाव जिल्ह्यात कोरोनाची ‘सेकंड लाट’; पून्हा काय सुरू होणार, कशावर राहणार करडी नजर, वाचा सविस्तर.. 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची ‘सेकंड लाट’; पून्हा काय सुरू होणार, कशावर राहणार करडी नजर, वाचा सविस्तर.. 

जळगाव ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्याचा हा परिणाम आहे. कोरोनाची जणू सेकंड लाट जिल्ह्यात आली आहे. यामुळे कोरोनाशी संबंधित सर्व आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. बंद केलेली कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू करून त्यात बेडसची उपलब्धता, ऑक्सिजन, सॅनिटायझर्स, औषधींची उपलब्धता करण्यात येत आहे. डॉक्टर, नर्सेसला पुन्हा कोरोनावर उपचारासाठीचे ट्रेनिंग देणे सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘सकाळ’ला दिली. 

जानेवारी महिन्यात कोरोना बाधीतांची संख्या कमी झाली होती. मात्र सध्या सुरू असलेली लग्न सराई, राजकीय पक्षाच्या बैठका, सभांमुळे एकाच ठिकाणी असंख्य लोकांची गर्दी वाढली आहे. त्यातूनच कोरोना बाधीतांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी जर नियमांचे पालन केले असते तर कोरोना आटोक्यात राहिला असता. मात्र आत तसे चित्र नाही. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट कारवाईच होणार आहे. कोरोना बाधीतांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच राहिली तर पुन्हा लॉकडाऊन अटळ आहे. 

कोरोना बाधीतांची संख्या वाढल्याने जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात तीन वॉर्ड कोरेाना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यात सर्व औषधीसाठी, ऑक्सिजन, व्हेटींलेटरची सुविधा, प्रशिक्षित स्टा्फ ठेवण्यात आला आहे. 
सोबतच बंद केलेली तालुकास्तरावरील सर्व कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल सुरू करण्याचे आदेशीत करण्यात आले आहेत. त्यातील बेडस, औषधसाठा, ऑक्सिजनची सुविधा देऊन पुरेसा स्टाफ उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे. जेणे करुन रुग्णांना त्याच तालुक्यात दाखल करण्यात येईल. 
सोबत डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, इकरा कॉलेजमध्येही रुग्णांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. ज्याठिकाणी रुग्ण आढळताहेत तेथे पुन्हा कोरोना तपासणी करण्यात येईल. 

अलर्टचे आदेश 
कोरोना बाबत टास्क फोर्स समितीची बैठक घेऊन अलर्टचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व डॉक्टर, नर्सेस इतर स्टाफला बोलावून त्यांना पुन्हा कोरोनावर उपचार कसे करायचे, दक्षता कशी घ्यावयाची याबाबत ट्रेनिंग देणे सुरू झाले आहे. 


लग्न, बैठकावर करडीनजर 
लग्न समारंभ, बैठकांमध्ये केवळ पन्नास लोकांची उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. जर जास्त लोक असतील तर त्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आज आणखी कारवाई कडक केली आहे. सर्वानीच घरा बाहेर पडताना मास्क लावूनच पडले पाहिजे. दुकानदार, बाजारपेठा, व्यापारी संकुलात गर्दी होणार नाहीत याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा- अवकाळीचे संकट; धुळे, नंदुरबार जिल्‍ह्यांत गारांसह पाऊस 


राजकीय पदाधिकाऱ्यांची चर्चा 
सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्यांना बैठका, सभा, मेळाव्यात कमीत कमी लोकांना बोलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे, बसेस, खासगी गाड्यांमध्ये प्रवाशांनी मास्क लावला किंवा नाही याची तपासणी करून दंड करण्याची कारवाई करण्याचे आर.टी.ओ.विभागाला सांगितले आहे. सर्वच प्रकारची आपण दक्षता घेत आहोत. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com