भर पावसातही जळगावकरांना प्यायला पाणी नाही; 4 दिवसांपासून पुरवठा ठप्प

jalgaon water shortage
jalgaon water shortageesakal

जळगाव : तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु आहे.. रस्ते पाण्याखाली आहेत.. तर दुसरीकडे जळगावकरांना प्यायला पाणी नाही, अशी अवस्था केवळ महावितरण आणि महापालिकेच्या गलथान कारभारामुळे झालीय. कुसुंब्याजवळ कुठेतरी महावितरणची केबल तुटल्याने वाघुर योजनेवरील यंत्रणा बंद असल्याने शहरातील पाणीपुरवठा ठप्प आहे. (Jalgaon residents water crisis even heavy rains supply stopped for 4 days jalgaon Latest news)

जळगावात ज्या भागात गेल्या सोमवारी पाणी आले होते, त्या भागात आजपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. आधीच दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना तब्बल पाच दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांना भर पावसात पिण्यासाठी पाणी शोधावे लागत आहे.

नागरिकांना रात्र जागून काढली

शहरातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झालेला असताना महापालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे गुरुवारी (ता.१५) पाणी येणार या प्रतीक्षेत नागरिकांचा कालचा दिवस गेला. सूचनाच नसल्यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत नागरिकांनी गुरुवारची रात्र जागून काढली. शुक्रवारी नागरिकांच्या घरातील पाण्याची भांडी कोरडी ठाक झाली. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड संताप होतोय.

हे आहे कारण

पाणीपुरवठा विस्कळित होण्याचे कारण वाघुर पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा करणारी केबल खराब झाली, असे सांगितले जात आहे. गुरुवारी केबलमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आल्यानंतर नेमका बिघाड कुठे झाला, हेच महावितरणच्या यंत्रणेला दोन दिवसांतही समजू शकले नाही.

jalgaon water shortage
बागायती कपाशी पिकासाठी आताचा पाऊस धोक्याची घंटा

दोन दिवसांनंतर बिघाड समोर

शुक्रवारी दुपारी हा बिघाड लक्षात आल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, दुपारपासून जळगाव शहरासह परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला. तो रात्रीपर्यंत सुरुच होता. त्यामुळे या कामातही व्यत्यय आला.

पुरवठ्याबाबत अनिश्‍चितता

केबलमधील बिघाड दुरुस्तीचे काम सुरु असले तरी पावसामुळे त्यात व्यत्यय येत आहे. पाच- सहा तासांत दुरुस्ती अपेक्षित असताना पावसामुळे त्याला अधिक वेळ लागू शकतो. शुक्रवारी (ता.१६) रात्रीपर्यंत केबल दुरुस्त होऊ शकलेली नव्हती. केबल दुरुस्त झाल्यानंतर सात- आठ तासांच्या कालावधीनंतर पाणीपुरवठा सुरु होऊ शकेल. त्यामुळे शनिवारीही पाणीपुरवठा केव्हा सुरळीत होईल, हे अद्याप निश्‍चित नाही.

"महावितरणकडून वाघुर यंत्रणेला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य केबलमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले आहे. दुरुस्तीचे काम सुरु असून वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर युद्धपातळीवर पंपिंग करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. मात्र, त्यास किती वेळ लागेल, हे आताच सांगता येणार नाही."- संजय नेमाडे पाणीपुरवठा अभियंता, मनपा

jalgaon water shortage
Jalgaon : रस्त्यांची कामे होत नसल्याने महापालिकेत ‘दांगडो’!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com