Jalgaon Water Crisis : वरणगावात 15 दिवसांआड पाणीपुरवठा; योजनांवरील कोट्यवधींचा खर्च पाण्यात

Jalgaon News : शहरातील नागरिकांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरात पंधरा दिवसांत एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Water supply by tanker.
Water supply by tanker.esakal

वरणगाव : शहरातील नागरिकांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरात पंधरा दिवसांत एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांची तहान भागणे दिवसेंदिवस कठीण होऊन बसले आहे. मागील दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा झालेला खर्च बघता पाण्यासाठी केलेला खर्च पाण्यातच गेला म्हणण्याची वेळ आली असून, टँकरलॉबी पोसण्यासाठी टंचाई निर्माण केली जात असल्याचाही सूर उमटत आहे. (Jalgaon Water Crisis)

शहरातील लोकसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. याचा विचार करून नगरपरिषदेने शहरातील नागरिकांची पुरेशी तहान भागविण्यासाठी मुबलक पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. शहराची तहान भागेल, अशी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना शहरात कार्यान्वित आहे. नवीन योजनेचे कार्य प्रगतिपथावर सुरू आहे.

आहे त्या जुन्या योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र नियोजनाअभावी व पालिकेच्या अनास्थेमुळे नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. तर संपूर्ण जलवाहिनीला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळतीचे स्वरूप प्राप्त झाले असून, लाखो लिटर प्रक्रिया केलेले पाणी वाया जात असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य अजय पाटील यांनी एका चित्रफितीच्या माध्यमातून नागरिक व व्यवस्थेच्या लक्षात आणून दिले असताना.

देखील पालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरिकांचा संताप होत आहे. शहरातील नागरिकांना गेली दहा ते बारा वर्षांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पंधरा दिवसांत एकवेळ शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांची तहान भागणे दिवसेंदिवस कठीण होऊन बसले आहे. (latest marathi news)

Water supply by tanker.
Jalgaon Banana Crop : वाढत्या तापमानामुळे केळी बागा करपल्या; प्रचंड उष्णतेचा केळी पिकला फटका

कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकांना टँकरच्या माध्यमातून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पालिका प्रशासन नागरिकांकडून सर्वच बाबींवर कर आकारते; मात्र सुविधा उपलब्ध करून देण्याकडे पाठ फिरवीत आहे.

मागील दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा झालेला खर्च बघता पाण्यासाठी केलेला खर्च पाण्यातच गेला म्हणण्याची परिस्थिती आता शहरात बघावयास मिळत आहे. टँकरलॉबी पोसण्यासाठी टंचाई निर्माण केली जात असल्याचाही नगर परिषदेवर आरोप केला जात आहे.

"शहराचा पाणीपुरवठा लक्षात घेता वरिष्ठांच्या माध्यमातून कठोरा पंपिंग हॉऊससाठी एक्सप्रेस फिडरचे कार्य सुरू झालेले आहे. इलेक्ट्रिक खांब लावणे सुरू आहे. लवकरच पाणीटंचाई आटोक्यात येईल व वरणगावकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे." - सचिन राऊत, मुख्याधिकारी, वरणगाव नगर परिषद

Water supply by tanker.
Jalgaon Lok Sabha Constituency : विरोधकांच्या तोंडी विकासाची नव्हे, शिव्यांची भाषा : फडणवीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com