
धरणगावात पाणी समस्या अनेक वर्षापासून असून या समस्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु पोलिस स्टेशनने परवानगी नाकारल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला होता.
धरणगाव ः धरणगावात पाण्याची प्रचंड समस्या असून नागरीक त्रस्त आहे. ही समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी धरणगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जनार्दन पवार व नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना पाण्याची समस्या न सुटल्यास नगरपरिषदेवर जनआक्रोश मोर्चा आणला जाईल असा इशारा दिला.
वाचा- कोरोना योद्धे आंदोलनाच्या पवित्र्यात
धरणगावात पाणी समस्या अनेक वर्षापासून असून या समस्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु पोलिस स्टेशनने परवानगी नाकारल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी पून्हा निवेदन देत ही समस्या त्वरीत सोडवावी अन्यथा जन आक्रोश मोर्चा काढला जाईल असा इशाऱयाचे निवेदन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पवार यांना दिले.
टँकरने पुरवठा करा
धरणगावाता पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्याची काम त्वरीत करावे. तसेच पुरवठा सुरळीत होईल तो पर्यंत नागरिकांना टँकरने पाण्याचा पुरवठा करावा. अशी विनंती निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी मधुकर रोकडे, ॲड. वसंतराव भोलाणे, पुनीलाल महाजन, प्रकाश सोनवणे, शहराध्यक्ष दिलीप महाजन, सरचिटणीस सुनील चौधरी, गुलाबराव मराठे, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद अण्णा कंखरे, नगरसेवक ललित येवले, नितीनसिंह बयस (कडू अप्पा ) आदी उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे