जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण; केळी पिकांवर परिणाम !

जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण; केळी पिकांवर परिणाम !

जळगाव ः जिल्हयात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण आजही काम होते. गारपीट, वादळ, विजांचा कडकडाट नूकसान झाले नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. या प्रतिकूल वातावरणामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अभाव आहे. केळी पिकाची वाढ कमी होण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. 

गेल्या तीन दिवसा पासून सूर्यदर्शन झालेले नाही. शेतकरी चिंतेत आहेत. रब्बीमध्ये कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारी, गहू या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. तर मका, बाजरी, कांदा लागवड, पेरणी सुरू आहे. पेरणी ठप्प आहे. इतर कामांवर परिणाम झाला आहे. अधूनमधून हलका पाऊस येत आहे. यामुळे सकाळपासून थंड वातावरण राहत आहे. दुपारीदेखील थंडी जाणवत आहे. तर पहाटे धुके दाटून येत आहे. कुठेही जोरदार किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला नाही. परंतु हलक्या पावसाने, ढगाळ वातावरणाने जमिनीतील आर्द्रता वाढली आहे. 

गेल्या २४ तासात जळगाव व अमळनेर मध्ये चार मिलीमिटर, पाचोरा येथे सात मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सातपुड्यातील चोपडा, रावेर येथेही हलका पाऊस झाला आहे. गारठा वाढला आहे. यामुळे दुपारीदेखील उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com