
जळगाव : येथील उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांपासून रेंगाळले आहे. यामुळे शिवाजीनगरवासीयांना ये- जा करण्यासाठी नित्याने पाच किलोमीटरचा शहराला फेरा मारावा लागत आहे.
शिवाजी नगरवासीयांसाठी हा पुल म्हणजे जीवनदायिनी होता. याच पुलावरून नागरिकांना ये-जा करावी लागत होती. मात्र पुल बांधून शंभरपेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाल्याने रेल्वेने हा पुल पाडून नवीन बांधण्याचे काम हाती घेतले आहे. पुलाच्या बांधकामावरून झालेल्या वादामुळे हा पुल ज्या जागी होता, त्याच जागी बांधण्याचे ठरविण्यात आले. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूचे पिलरचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही पिर्लरवर लवकरच गर्डर टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. एकूण तेवीस पिलरवर हा पुल उभारण्यात येत आहे. फेब्रुवारी २१ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
हे अद्यापही बाकी...
आजही पुलाच्या कामात अडथळा ठरणारे विजेचे खांब हटविणे बाकी आहे. महापालिकेने वीज कंपनीला याबाबत पत्र दिले आहे. मात्र अजूनही खांब हलविले जात नाही. जलवाहिनीचे स्थलांतर अद्यापही बाकी आहे. यामुळे कामात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामात अजूनही वीज कंपनीचे पोल, जलवाहिनीचे अडथळे आहेत. ते लवकर काढून स्थलांतर करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला तर पोल व जलवाहिनी लवकर स्थलांतर होतील. अपूर्ण काम लवकर पूर्ण होईल.
- विलास पाटील
कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग
शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामाची सुरुवात उशिरा झाली होती. लॉकडाउनमुळे काम लांबले आहे. मात्र, येत्या फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्यास कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे. गर्डर टाकणे, स्लॅब टाकणे याकामांना लवकरच सुरुवात होईल.
- सुभाष राऊत, उपअभियंता
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.