गिरणापात्रातील पुराचे पाणी कालव्यांमध्ये सोडले

यंदा खानदेशात कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चिंतित झाले आहेत.
Girna River
Girna River

जळगाव : सध्या कमी पाऊस असल्याने सरपंचांसह शेतकऱ्यांनी (Farmers) केलेल्या मागणीची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांनी निर्देश दिल्यानंतर गिरणा नदीपात्रातून (Girna River) पुराचे वाहून जाणारे पाणी दहीगाव आणि जामदा बंधाऱ्यातील कालव्यांच्या माध्यमातून सोडले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, नागरिकांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने गिरणा धरणात (Girna Dam) चांगला पाणीसाठा होता.

Girna River
जळगाव जिल्ह्यात कोरोना चाचण्यांत पुन्हा वाढ; चार नवे रुग्ण आढळले

यंदा ऑगस्ट महिना संपत आला, तरी गिरणा धरणात फक्त ४५ टक्के जलसाठा आहे. दरम्यान, धरणाच्या खालील भागातील बंधाऱ्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पात्रात पुराच्या स्वरूपात वाहून जाते. यामुळे हे पाणी जामदा आणि दहीगाव बंधाऱ्यांना लागून असणाऱ्या कालव्यांच्या माध्यमातून परिसरात सोडण्यात येते. यंदा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चिंतित झाले आहेत. यामुळे विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पालकमंत्री पाटील यांना गिरणा बंधाऱ्यांच्या कालव्यांमधून पाणी सोडण्यासाठी साकडे घातले होते. त्यांनी याची तातडीने दखल घेऊन गिरणा विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांना याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या अनुषंगाने जामदा आणि दहीगाव बंधाऱ्यांमधून कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आले.

Girna River
सात मोटारसायकलींसह ‘मृत’ चोरटा अटक..दोन वर्षांपासून फरार

जामदा बंधाऱ्यातील पाण्यामुळे बहाळ, कोळगाव, भडगाव व आमडदेसह परिसराला, तर दहीगाव बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे जळगाव, एरंडोल, धरणगाव आणि अमळनेर तालुक्यातील गावांना लाभ होणार आहे. यात प्रामुख्याने दापोरा, खेडी, रिंगणगाव, कढोली, वैजनाथ, टाकरखेडा, पाळधी, पथराड, फुलपाट, झुरखेडा, दोनगाव, चांदसर, पिंपळगाव, वराड, हिंगोणा, पिंप्री, अमळनेर तालुक्यांतील पातोंडा, जळोद, कलालीसह इतर गावांना लाभ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळावे, यासाठी रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी साकडे घातले जात होते. सोडलेल्या पाण्यामुळे छोट्या नाल्या-ओढ्यात पाणी वाहून विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढेल. धरणगाव, एरंडोल, अमळनेर तालुक्यातील ७० ते ८० गावांना फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com