हतनूरचे २४ दरवाजे उघडले, तापी नदीला पूर 

हतनूरचे २४ दरवाजे उघडले, तापी नदीला पूर 

जळगाव  ः हतनूर धरण क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामुळे धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडले असून धरणातून तापी नदीपात्रात ९१ हजार २६७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापी नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील ७२ तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून सूर्यदर्शन नाही, पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना रेाजगारासाठी बाहेरही पडता येत नाही. 

तीन दिवसांपासून पाऊस 
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. तीन दिवसांपासून सूर्यदर्शनही नाही. भिजपावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. तर काही भागात चांगला पाऊस झाल्याने नदी-नाले वाहू लागले आहेत. सलग सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

रस्ते झाले खड्डेमय... 
शहरासह ग्रामीण भागातील रस्ते, राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते सततच्या पावसाने खड्डेमय झाले आहे. यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून धड वाहनेही चालविता येत नसल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनधारकांच्या वाहनांचे अपघात होत आहेत. 

जिल्ह्यातील पाण्याचा विसर्ग अजून वाढणार आहे. यासाठी पुढील ७२ तासासाठी नागरिकांनी नदी काठावर जाऊ नये. आपली गुर-ढोरांना नदीकाठी नेऊ नये, नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. 
- अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी) 
 

संपादन-भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com