मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने किमान 3 जणांना तरी मारलं असतं

मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने किमान 3 जणांना तरी मारलं असतं

जळगाव : जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्काराचे दोन जवान शहीद झाले. यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हे जवान शहीद झाले. शहीद यश यांच्यावर आज शासकीय इतमात अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्कारापूर्वी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना शहिद जवान यशचे वडिल दिगंबर देशमुख म्हणाले, की अतिरिक्यांनी भ्याड पद्धतीने मागून हल्ला केला. त्यांनी पुढून हल्ला केला असता तर माझ्या यशने तिन जण तरी मारले असते अशी प्रतिक्रिया दिली. 


श्रीनगर जवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले होते. भ्याड हल्यात चाळीसगावचे यश देशमुख हे जवान शहिद झाले. आपल्या मुलांच्या आठवणी सांगतांना यशचे वडील दिगंबर देशमुख म्हणाले, की यश सप्टेंबर महिन्यात घरी आला होता. 2 ऑक्टोबरला पून्हा आपले कर्तव्य बजाविण्यासाठी परत गेला. आमचे 4 दिवसांपूर्वी फोनवर देखील बोलणं झालं होत असे सांगितले.

आणि अधिकाऱयांचा फोन आला
शहीद जवान यश यांचे वडील म्हणाले, की भारतीय लष्करी आधिकाऱयाचा मला गुरुवारी फोन आला आणि म्हणाले, की तो खूप जिद्दी होता, परिस्थितीची त्याला जाणीव होती मात्र असं त्यांनी सांगितलं.


वर्षभरापुर्वीच मल्ट्रीत भरती
यश देशमुख हे गेल्या वर्षी मिल्ट्रीमध्ये भरती झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमध्ये त्याची नेमणूक करण्यात आली होती. शेतकरी कुटुंबातील असलेल्या यशच्या शहीद होण्याने त्याच्या पिंपळगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com