तळपत्या सूर्यामुळे उरल्या फक्त काड्या; वृक्ष जगवण्याकडे दुर्लक्ष

निगेअभावी अनेक रोपटी जळाली असून केवळ काड्या शिल्लक राहिल्या आहेत.
Raod
Raodesakal

जळगाव : महामार्ग प्राधिकरण विभागाकडून हजारो रोपटी लावल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात लावण्यात आलेल्या रोपट्यांची परिस्थिती अवघड असल्याचे दिसून येत आहे. निगेअभावी अनेक रोपटी जळाली असून केवळ काड्या शिल्लक राहिल्या आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण करताना तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात या रोपट्यांची लागवड करण्यात आलेली आहे. परंतु रोपट्यांची निगा न राखल्याने तळपत्या सूर्यामुळे त्याची पाने जळून आता केवळ काड्या शिल्लक राहिल्या आहेत. आधीच महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक झाडांची कत्तल झाली आहे, त्याचा परिणाम म्हणून तापमान वाढ झालेली असताना भविष्यात अशा पध्दतीचा वृक्षारोपण कार्यक्रम राबविल्यास तापमान ५० अंश झाल्यास आश्चर्य वाटू नये अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Raod
भावाने मोबाईल पाहू नको सांगितल्याने बहिणीची आत्महत्या

जिल्ह्याचे यंदा मेत तापमान ४५-४६ अंशापर्यंत सलग काही दिवस होते. भुसावळचे तापमान ४७ अंशावर पोचले होते. उष्णतेची लाटच होती. ही तापमान वाढ पर्यावरणाचे रक्षण न झाल्याने झाली आहे. पूर्वी महामार्गाचे चौपदरीकरण झालेले नसताना उन्हाळ्यात तापमान ४० ते ४१ दरम्यान असायचे. तरसोद ते चिखली, तरसोद ते फागणे दरम्यान झालेला महामार्ग, जळगाव शहरात झालेला महामार्गाच्या चौपदरीकरणात झालेली असंख्य झाडाची कत्तल हे तापमान वाढीचे मुख्य कारण सांगण्यात येत आहे. २०१८-१९ पासून जिल्ह्यात महामार्गाच्या कामांना सुरवात झाली. यात दहा हजारांवर झाडाची कत्तल करण्यात आली. त्या बदल्यात सुमारे पन्नास हजार झाडे लावल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाने केला असला तरी महामार्गाच्या कामासाठी कत्तल झालेल्या बेसुमार झाडांच्या कत्तलीने जिल्ह्याचे तापमान वाढलेले आहे.

महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार तरसोद ते चिखली दरम्यान ४३ हजार २८८ झाडे, तरसोद ते फागणे दरम्यान ३ हजार २९० झाडे, तर जळगाव शहरात ३ हजार ४२८ अशी एकूण ५० हजार ६ झाडे लावली आहेत. वनविभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सक्षम यंत्रणेने महामार्ग प्राधिकरणास झाडे लावून संवर्धन करण्यास भाग पाडावे, अशी मागणी वृक्ष प्रेमी करीत आहे.

Raod
घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्याला अटक

''जळगाव जिल्ह्यात महामार्गाच्या कामांमध्ये हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळेच भुसावळ शहराचे तापमान यंदा ४७ अंशापर्यंत पोचले आहे. अधिकाधिक झाडे लावणे हाच पर्यावरण रक्षणाचा मार्ग आहे.'' - सुरेंद्र चौधरी, पर्यावरण अभ्यासक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com