शिक्षक भरतीसाठी नवीन नियम ; बढतीसाठी द्यावी लागणार आता 'ही' परीक्षा

लवकरच राज्यातील रिक्त जागांवर कायमस्वरूपी होणार शिक्षकांची भरती
Teacher
TeacherEsakal

बेळगाव : शिक्षकांना (Teacher) बढतीसाठी यापुढे स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी शिक्षकांची नेमणूक करताना स्पर्धा परीक्षा घेऊन यापुढे शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

शिक्षण खात्यातर्फे लवकरच राज्यातील रिक्त असलेल्या जागांवर कायमस्वरूपी शिक्षकांची भरती करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. शिक्षक भरती ( Teacher Recruitment)बाबत सरकारकडून हिरवा कंदील मिळतात भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात येईल अशी माहिती काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्र्यांनी दिली होती. त्याच बरोबर आता सहावी ते आठवीसाठी शिक्षकांची नेमणूक करताना स्पर्धा परीक्षा (Competitive Exam)घेतली जाणार आहे.

Teacher
राज्यसरकारकडे पैसे नसतील, तर आम्हाला सांगा; पंकजा मुंडे संतापल्या

शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठीचे नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार शिक्षक भरतीसाठी उमेदवार टीईटी परीक्षा (TET Exam)पास झालेला असेल. टीईटी पास झाल्यानंतर उमेदवारांना सीईटी (CET Exam) परीक्षा द्यावी लागेल सीईटी परीक्षेत पास झाल्यानंतर गुणवत्तेनुसार भरतीसाठी यादी जाहीर केली जाणार आहे. शिक्षकांची भरती झाल्यानंतर सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षकांची नेमणूक करताना स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेत पास झालेल्या शिक्षकांना भरतीत प्राधान्य देण्यात येणार आहे.

शिक्षण खात्याने सहावी ते आठवीसाठी शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला तरी प्राथमिक शाळांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षकांना अगोदर बढती द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांकडून केली जात आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षकांची नेमणूक करताना ६७ टक्के शिक्षकांची नव्याने भरती तर त्यात ३३ टक्के शिक्षकांना सेवा बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असून राज्यात सहावी ते आठवीच्या वर्गांमध्ये ५२६३० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा वेळेत भरती करणे गरजेचे असून रिक्त शिक्षकांच्या जागांवर सध्या अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू होत असल्याने अनेक नव्या नियमांची भर पडत असून सहावी ते आठवीसाठी शिक्षक भरती करताना स्पर्धा परीक्षेचे नवा नियम लागू होणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळण्यास मदत मिळणार आहे.

ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com