कोल्हापूर - अनाथ तसेच आई-वडील हयात नसलेल्या मुलींना गगनबावडा येथील निवासी शाळा मायेचा आधार ठरली आहे. या शाळेच्या प्रवेशक्षमतेत यंदा वाढ झाली आहे. सहावी ते आठवी तसेच नववी ते बारावीसाठी प्रत्येकी ५० जागा शासनाने वाढवून दिल्या आहेत. दोन्ही वर्गांसाठी प्रत्येकी दीडशे अशी तीनशे इतकी प्रवेश क्षमता झाली आहे.
मुलींच्या प्राथमिक शिक्षणाची गरज ध्यानात घेऊन २००८ मध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या नावाने शाळा सुरू झाली. गगनबावड्यासारख्या दुर्गम आणि पावसाचे प्रमाण
मोठ्या प्रमाणावर असलेल्या शाळेला प्रतिसाद मिळेल की
नाही, याबाबत शंका होती. मात्र अनाथ, निराधार मुलींसाठी ही शाळा आधार ठरली. सहावी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण आणि राहण्याचा सर्व खर्च शासनाचा असे शाळेचे वैशिष्ट्य आहे. सुरुवातीच्या काही वर्षांनंतर सध्या ही शाळा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये भरत आहे. गेल्या दहा वर्षांत याच शाळेतून ‘सावित्रीच्या लेकी’ घडल्या. जिल्हा परिषदेतर्फे ही शाळा चालविली जाते.
निवासी शाळा दहावीपर्यंत आहे. शासनाने यंदा ज्युनियर कॉलेजच्या प्रवेशाला मान्यता दिली आहे. संबंधित मुली कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्यांच्या निवासाची सोय होस्टेलमध्ये होईल. २०१५ मध्ये केवळ १२१ इतकी प्रवेश क्षमता होती. आता १७० इतकी आहे. पालक मेळावे, शाळांत नेमक्या कोणत्या सुविधा दिल्या याची माहिती पालकापर्यंत पोचविल्याने प्रवेशात वाढ झाली आहे
- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी
प्रवेशाचे निकष
सुविधा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.