Hapus Mango : आता हापूस आंब्याची वाहतूक होणार Air Conditioner गाडीतून..; काय आहे सिंधू-रत्न समृद्ध योजना?

Ratnagiri Hapus Mango : बागायतदार किंवा व्यावसायिक हापूस आंबा विक्रीसाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठवित असतात. याच कालावधीत प्रचंड उष्मा असल्यामुळे अनेकवेळा दूरवर वाहतूक करताना हापूस आंब्याचे मोठे नुकसान होते.
Sindhuratna Samrudh Yojana
Sindhuratna Samrudh Yojanaesakal
Updated on

रत्नागिरी : संवेदनशील हापूसची उन्हातून वाहतूक केल्यास फळामध्ये साका तयार होण्याची भीती असते. त्यामुळे फळ खराब होते आणि त्याचा फटका आंबा बागायतदाराला बसतो. हे टाळण्यासाठी दूरवर आंबा (Ratnagiri Hapus Mango) वाहून नेण्याच्या उद्देशाने ‘सिंधू-रत्न समृद्ध’ योजनेतून (Sindhuratna Samrudh Yojana) १ वातानूकुलित गाडी पणन मंडळाकडे उपलब्ध झाली आहे. त्याचा उपयोग आंबा बागायतदारांना होणार आहे. त्याचे लोकार्पण आज (ता. १) पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com