

Amba Ghat road development
esakal
दृष्टिक्षेपात
मिऱ्या ते आंबा ५७ किमीचा टप्पा
महामार्गाचे ९५ टक्के काँक्रिटीकरण पूर्ण
महामार्गाचे काम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात
Kolhapur Ratnagiri highway : मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. मिऱ्या ते आंबा घाट असा ५७ किमीचा टप्पा आहे. घाटात निम्म्यापर्यंत चौपदरीकरण झाले आहे. उर्वरित ७ किमी घाट एका रेषेत नसल्याने ३ बोगदे काढण्यात येणार आहेत. त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) सुरू आहे.