गढूळ पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण; रत्नागिरी पालिकेबद्दल संताप

bad water supply in ratnagiri
bad water supply in ratnagiri

रत्नागिरी - शहराला शुक्रवारी (ता. 5) पाणीपुरवठा झाला पण संपूर्ण पाणी गढूळ आल्याने नागरिक संतापले. कोट्यवधीची पाणीयोजना सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्रावरही लाखो रुपये खर्च केले आहेत तरी गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला. 

नवीन मुख्य जलवाहिनी पालिकेने गुरुवारी (ता. 4) सुरू केली. या वाहिनीला शून्य टक्के गळती असून पाइपमध्ये साचलेली माती आल्याने पाणी गढूळ झाले. शीळ जॅकवेलचे पंपही बदलण्यात येणार आहेत. गैरसोईबाबत सहकार्य करावे, असा खुलासा पालिकेने केला आहे. 

शहराला आज झालेला पाणीपुरवठा पाहून रत्नागिरीतील नागरिकांची तळपायाची आग मस्तकात गेली. पिण्यासाठी वापरात येणारे पाणी अतिशय खराब आणि गढूळ आहे. पाण्याचा रंग बघून हे नक्की पिण्यासाठी किंवा अंघोळीसाठीही योग्य नसल्याने नागरिकांचा संताप झाला. शहरात काही ठिकाणी पाणीपुरवठा झाला नाही म्हणून नागरिक पालिकेत धडकले होते. पाण्याबाबत नागरिकांची ओरड कायम असताना गढूळ पाण्याने संतापात भर पडली. 63 कोटी रुपये खर्चून आणि जलशुद्धीकरण केंद्रासाठी दीड कोटी रुपये खर्चूनही गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांनी पालिका प्रशासन आणि यंत्रणेच्या नावाने खडे फोडले. 

याबाबत पालिकेची बाजू घेतली असता ते म्हणाले, शीळपासून साळवी स्टॉपपर्यंत येणारी मुख्य जलवाहिनी जोडली आहे. गुरुवारी त्याची चाचणी झाली. पाइपमध्ये साचलेली माती आल्याने पाणी गढूळ आल्याचा दावा केला. तसेच नवीन पंप आले असून ते बसवतानाही पाण्याची अनियमितता आणि गढूळ येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. 
 
  संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com