

‘Concrete Jungle’ Expands in Ratnagiri; Environmental Alarm Raised
Sakal
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी जमिनीच्या वापरात २०१७ ते २०२४ या सात वर्षांत सुमारे २७४.८ किमी जंगल क्षेत्र नष्ट झाले आहे. बांधकाम क्षेत्रात १०६ टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. हिरवाईच्या क्षेत्रात मोठी घट नोंदविली आहे. शहरीकरण आणि बांधकामांचा वेग प्रचंड असून, अवघ्या सात वर्षांत हे क्षेत्र १९५ किमी वरून ४०५.६ किमीवर पोहोचले आहे. इम्पॅक्ट वेधशाळा २०२५ च्या आकडेवारीवर आधारित ‘आयफॉरेस्ट’ने केलेल्या विश्लेषणानुसार जिल्ह्यात नैसर्गिक प्रणालींवर मानवी हस्तक्षेप आणि शहरीकरणाचा दबाव प्रचंड वाढला आहे. ही बाब धोकादायक आहे.