दुर्मिळ रानभाज्यांचे जतन गरजेचे 

दुर्मिळ रानभाज्यांचे जतन गरजेचे 

कुडाळ - दुर्मिळ रानभाज्या या आपल्या पारंपरिक भाज्या आहेत. त्याचे जतन करणे काळाची गरज आहे. या रानभाज्या मुळापासून उपटू नयेत. याबाबत प्रत्येकाने शाश्‍वत पद्धतीची माहिती करून घ्यावी, असे प्रतिपादन निसर्गप्रेमी अभ्यासक डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी आज रानमाया महोत्सवात केले. या महोत्सवात जिल्ह्यातून सुमारे 50 रानभाज्या व 96 पाककृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. 

तरुण पिढीला दुर्मिळ रानभाज्यांचा अभ्यास, महत्व माहिती पाहिजे. या भाज्यांना आहारात किती महत्त्व आहे ते पटवून दिले पाहिजे. या अनुषंगाने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे, कुडाळ हायस्कूल आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ हायस्कूल येथे रानमाया महोत्सवाअंतर्गत रानभाज्या व पाककृतीचे आयोजन केले होते. उद्‌घाटन नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती राजन जाधव, कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, रोटरी क्‍लब कुडाळ माजी अध्यक्ष गजानन कांदळगावकर, प्रमोद भोगटे, राजन बोभाटे, रोहिणी सामंत, बाबा पोरे, डी. के. परब, का. आ. सामंत, आनंद वैद्य, सुरेश चव्हाण, स्नेह सिंधूचे अध्यक्ष हेमंत सावंत, पंकज दळी, प्रफुल्ल वालावलकर, बाळा कुडाळकर, प्रसाद नाईक आदी उपस्थित होते. 

डॉ. गावडे म्हणाले, ""जिल्ह्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ओळखल्या हव्यात. त्याची परिपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. केवळ भाज्या खाण्यापूरत्या न राहता त्यातून आर्थिक उत्पन्न कसे मिळेल, या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्यांचा व्यापार होतो. आहारात रानभाज्यांचे पारंपरिक अनुकरण कसे करता येईल, या दृष्टीकोनातून गृहिणींनी माहिती घ्यावी.'' 

नगराध्यक्ष तेली म्हणाले, ""जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी जिल्ह्याची आर्थिक उन्नती साधता यावी, यासाठी पहिला टप्पा आठवडा गावठी बाजार यशस्वी केला. दुसऱ्या टप्प्यातील त्यांचे रानभाज्यांचे पाऊल यशस्वी होईलच. आता भविष्यात तिसरा टप्पा जिल्ह्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी वाटचाल करावी.'' डॉ. बाळकृष्ण गावडे व रोहिणी सामंत यांनी परीक्षण केले. 

आठवडा बाजारात रानभाज्या असतील 
जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई म्हणाले, ""सिंधुदुर्गात रानभाज्या दुर्मिळ व मोठ्या प्रमाणात आहेत. आजची युवा पिढी या भाज्या विसरत चालली आहे. त्यांना या भाज्या आठवणीत राहाव्यात, यासाठी हा महोत्सव घेण्याचा उद्देश आहे. सिंधुदुर्गाचा आठवडा गावठी बाजार यशस्वी झाला तशाच प्रकारच्या रानभाज्या लवकरच गावठी बाजारमध्ये उपलब्ध केल्या जातील.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com