Water flowing through Rajnala Canal rejuvenates farmlands in Karjat taluka
sakal
कोकण
Rice Cultivation : शेती, पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना; राजनाला कालव्यामुळे ग्रामीण विकासाचा नवा अध्याय
Karjat Farmers : राजनाला कालव्याच्या पाण्याने कर्जत तालुक्यातील शेतीला नवे जीवन मिळाले असून, दुबार भातशेतीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. हिरवळीने नटलेले शेतशिवार आणि उत्पादनवाढीची आशा यामुळे ग्रामीण भागात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कणकवली : राजनाला कालव्याच्या पाण्यामुळे कर्जत तालुक्यात दुबार भातशेतीची लगबग सुरू झाली असून, शेतशिवार पुन्हा हिरवळीने नटू लागले आहे. ४५ गावांतील सुमारे २,५४२ हेक्टर शेतीला या कालव्याद्वारे सिंचनाचा आधार मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

