

Weatern Ghat
sakal
बांदा : केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील २५ गावांना ‘इको सेन्सिटिव्ह एरिया’ म्हणून घोषित करणारी अंतिम अधिसूचना जारी केली आहे. यामुळे पश्चिम घाटाच्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या पट्ट्यात प्रस्तावित औद्योगिक, खाण आणि महामार्ग प्रकल्पांवर आता कठोर पर्यावरणीय नियम लागू होणार आहेत.