आंबेनळी घाटात भीषण अपघात, आठ मृतदेह हाती

सकाळ उपक्रम प्रतिक्रिया अॅड. जयेश वाणी
सकाळ उपक्रम प्रतिक्रिया अॅड. जयेश वाणी

महाबळेश्वर : कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना महाबळेश्वरला सहलीसाठी घेऊन निघालेली बस आंबेनळी घाटातील दाभिक टोक जवळ दरीत कोसळली. यातील आठ मृतदेह हाती आले आहेत.  सकाळी 6.30 वाजता 38 कर्मचारी दोन चालक असे एकूण 40 प्रवासी असलेली बस दोपोलीहून निघाली होती. प्रवाशांच्या मदतीसाठी पोलिसांचे बचाव पथक, ट्रेकर्स टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. परंतु, बचावकार्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आजून उपलंब्ध होऊ शकले नाही.  

महाबळेश्वरला पाऊस आणि धुके असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. पावसामुळे खडकांवर शेवाळ तयार झाले आहे. यामुळे पाय घसरण्याची भिती असते.   

सकाळी 10 वाजताच्या दरम्यान विद्यापीठात या अपघाताविषयी फोन आला. अपघात झालेल्या बसमधील एक कर्मचारी दरीतून वर आला आणि त्याने फोन करून घटनेची माहिती दिली. दरवर्षी भात लवाणी झाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची सहल जात असते. यावर्षीही ही सहल निघाली होती. बसमध्ये सर्व पुरूष आहेत. आम्ही घटनास्थळाकडे निघालो आहोत. या व्यतिरिक्त आणखी माहिती आमच्या पर्यंत पोहचली नाही.
- संजय भावे, वरिष्ठ कृषी अधिकारी, कोकण विद्यापीठ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com